समाजाच्या केंद्रस्थानी असलेली गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले ! गुलाब धांडे -पाटील तसा मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण , जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री -पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. अविनाश कोल्हे लिखित मराठी कादंबरी - पंगतीतलं पान , संदीप खरे यांच्या आवाजात.